Skip to content

वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध / Varkaryache Manogat Essay In Marathi


या पोस्ट मध्ये आपण वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Varkaryache Manogat Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Advertisement

Varkaryache Manogat Essay In Marathi

 वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

[ मुद्दे : वारकरी दरवर्षी वारी आळंदीहून पंढरपूरपर्यंत चालत नेम चुकवत नाही त्यामागची भक्ती, निष्ठा मोठी वारी हे या भक्तांचे जीवनसत्त्व कोणताच भेदभाव नाही निष्ठेपुढे अडचणी, आजारपण काहीच वाटत नाही – वारीकडे जगाचे लक्ष – अनेक विद्वान, संशोधक वारीला जातात वारी ही भक्तीची पेठ वारीला जाणारा वारकरी आपले काम टाळत नाही ]

मी एक वारकरी आहे. नुकतीच वारी पूर्ण करून आलो आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी वारी कधी चुकवत नाही. वारी करायचा शिरस्ता आणि ही तुळशीची माळ मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे.

Advertisement

जर शेतीवाडी मला वंशपरंपरेने मिळत असेल, तर वडिलांची भक्ती, निष्ठा हीपण वंशपरंपरेने का मिळू नये ? पण एक गोष्ट नक्की-ही भक्ती काही मी आंधळेपणाने स्वीकारलेली नाही. मी शेतकरी आहे, मला शेती करायला आवडते.

मी सुशिक्षित आहे, पदवीधर आहे. तरी पण वारीला जायलाही मला आवडते. वारी हे सर्व वैष्णवांचे विदयापीठ आहे. या विदयापीठात आम्हांला मिळणारे टॉनिक, जीवनसत्त्व हे आम्हांला वर्षभरासाठी पुरते. किंबहुना वर्षभरात येणाऱ्या विविध अडचणींवर आम्ही याच जीवनसत्त्वामुळे मात करतो.

Advertisement

वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी लाखो भक्त आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. या दिंडीत सर्व जाती-धर्माचे लोक असतात. सर्व वयाचे-अगदी वृद्धांपासून युवकांपर्यंत-सर्वजण वीस-एकवीस दिवस बरोबर असतात.

सर्व गैरसोय सहन करतात. कारण त्यांना ती गैरसोय वाटतच नाही. त्यांची जात, त्यांचा धर्म एकच असतो. ते सर्वजण त्या एकाच पंढरीची लेकरे असतात. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर संतांचे अभंग गुणगुणत चालतात. त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचे कष्टही वाटत नाहीत.

Advertisement

नाचत, गात, कीर्तन करीत, वेगवेगळे खेळ खेळत हे लाखो वारकरी जेव्हा एवढी वाट तुडवतात, तेव्हा ते केवळ भक्तिरूपच झालेले असतात. त्यामुळे या वारीच्या काळात आलेल्या अडचणी, आजारपण या सगळ्यांवर ते मात करू शकतात.

लाखो लोक एवढे एकदिलाने कसे एकत्र राहू शकतात, याचेच देशी-परदेशी लोकांना नवल वाटते. अनेक विद्वान, अभ्यासू लोकही या वारीत असतात. समाजशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे या स्वत: वारीबरोबर आल्या होत्या.

Advertisement

त्यांनी, विठ्ठलाचा उल्लेख ‘माय बॉयफ्रेंड’ असा केला होता. सर्वच वारकऱ्यांना विठोबा हा आपला ‘सखा’ वाटतो आणि या सख्याला भेटायला जाताना ते आपले ‘तनमनश्रम’ सर्व त्याच्या पायाशी अर्पण करून विठ्ठलमय होतात.

मित्रांनो, वारकरी आणि त्यांची दिंडी ही खरी भक्तीची पेठ आहे. मृग नक्षत्रावर शेताची पेरणी करून तो वारीला जातो आणि पंढरपूरच्या देवळाचा केवळ कळस पाहून देखील तो सुखावतो आणि मिळेल त्या वाहनाने परत फिरतो.

Advertisement

कारण त्याचे शेत, शेतातील कामे त्याची वाट पाहत असतात. वारीहून आल्या आल्या दुप्पट जोमाने तो कामाला लागतो. कोणत्याही इतर फळाची त्याला अपेक्षा नसते. कारण वारीचे फळ त्याला मनोमन मिळालेले असते.

वरील निबंध खलील विषयांवर देखील लिहू शकता

  • वारकरी मनोगत मराठी निबंध लेखन / Varkaryanche Manogat Marathi Nibandh
  • वारकरी वर मराठी निबंध दाखवा / Write Essay On Varkaryanche Manogat
  • वारकऱ्यांचे आत्मवृत्त मराठी निबंध / Essay Writing On Varkaryanche Manogat In Marathi

हे सुद्धा वाचा

आम्हाला आशा आहे की वारकरी मनोगत मराठी निबंध / Essay On Varkaryanche Manogat Essay In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद,

Advertisement


Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *